तुम्ही कोणाला भरवताय?
एकदा आजोबा आपल्या सात वर्षाच्या नातवासोबत बागेत फेरफटका मारत होते. त्या दोघांमध्ये खूप चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता आजोबा म्हणाले, " माझ्या आतमध्ये एक भयंकर युद्ध सुरू आहे आणि तेही दोन कोल्ह्यामध्ये. त्यातील एक कोल्हा राग,अहंकार,पश्चाताप,दुःख,द्वेष,मोह, मत्सर,उदासीनता,निराशा,खोटेपणा,न्यूनगंड या सारख्या विध्वंसक विचार व भावनांचे प्रतिनिधित्व करतोय तर
दुसरा कोल्हा आनंद,सुख,शांती,प्रेम,करुणा, सहकार्य,मानवता,प्रामाणिकपणा,उदारता,सहानुभूती यासारखाय जीवनाला उभारी देणाऱ्या विचार व भावनांचे प्रतिनिधित्व करतोय आणि महत्वाचे म्हणजे असे हे युद्ध तुझ्यात पण सुरू आहे शिवाय प्रत्येक माणसात सुरू आहे." थोडावेळ शांतता पसरली. काही पावले पुढे गेल्यावर तो बालक थांबला आणि आजोबांना त्याने प्रश्न केला," या दोन कोल्ह्यांपैकी कोणता कोल्हा हे युद्ध जिंकेल?". आजोबांनी थेट मुलाच्या डोळयात पाहिले व उत्तरले," ज्या कोल्ह्याला तुम्ही जास्त भरवाल तोच जिंकेल."
खरं आहे आपल्यातील कोणत्या कोल्ह्याला जिंकवायच हे सर्वस्वी आपल्या नियंत्रणात आहे. या कोल्ह्याचे खाद्य म्हणजे आपल्या धारण आणि विचार आहेत.आपण सातत्याने कोणता विचार करतोय,स्वतःशी कोणत्या प्रकारे बोलतोय, कोणत्या प्रकारच्या भावनांना गोंजारतोय शिवाय कोणत्या प्रकारच्या घटना पाहतोय, काय वाचतोय,कुणाच्या संपर्कात राहतोय या सारख्या गोष्टींमधून त्यांना भरवलं जातंय.जर का आपण योग्य कोल्ह्याला योग्य खाद्य पुरवलं तर निश्चितच आपल्यातील योग्य कोल्हा जिंकेल आणि जीवनात सशक्त धारणा, सकारात्मक विचार, विधायक भावना व प्रभावी वर्तनाची नांदी होईल.
You become what you think.
- Buddha
Mr. Abhijeet Manav.
( Mind trainer & NLP practitioner)
एकदा आजोबा आपल्या सात वर्षाच्या नातवासोबत बागेत फेरफटका मारत होते. त्या दोघांमध्ये खूप चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता आजोबा म्हणाले, " माझ्या आतमध्ये एक भयंकर युद्ध सुरू आहे आणि तेही दोन कोल्ह्यामध्ये. त्यातील एक कोल्हा राग,अहंकार,पश्चाताप,दुःख,द्वेष,मोह, मत्सर,उदासीनता,निराशा,खोटेपणा,न्यूनगंड या सारख्या विध्वंसक विचार व भावनांचे प्रतिनिधित्व करतोय तर
दुसरा कोल्हा आनंद,सुख,शांती,प्रेम,करुणा, सहकार्य,मानवता,प्रामाणिकपणा,उदारता,सहानुभूती यासारखाय जीवनाला उभारी देणाऱ्या विचार व भावनांचे प्रतिनिधित्व करतोय आणि महत्वाचे म्हणजे असे हे युद्ध तुझ्यात पण सुरू आहे शिवाय प्रत्येक माणसात सुरू आहे." थोडावेळ शांतता पसरली. काही पावले पुढे गेल्यावर तो बालक थांबला आणि आजोबांना त्याने प्रश्न केला," या दोन कोल्ह्यांपैकी कोणता कोल्हा हे युद्ध जिंकेल?". आजोबांनी थेट मुलाच्या डोळयात पाहिले व उत्तरले," ज्या कोल्ह्याला तुम्ही जास्त भरवाल तोच जिंकेल."
खरं आहे आपल्यातील कोणत्या कोल्ह्याला जिंकवायच हे सर्वस्वी आपल्या नियंत्रणात आहे. या कोल्ह्याचे खाद्य म्हणजे आपल्या धारण आणि विचार आहेत.आपण सातत्याने कोणता विचार करतोय,स्वतःशी कोणत्या प्रकारे बोलतोय, कोणत्या प्रकारच्या भावनांना गोंजारतोय शिवाय कोणत्या प्रकारच्या घटना पाहतोय, काय वाचतोय,कुणाच्या संपर्कात राहतोय या सारख्या गोष्टींमधून त्यांना भरवलं जातंय.जर का आपण योग्य कोल्ह्याला योग्य खाद्य पुरवलं तर निश्चितच आपल्यातील योग्य कोल्हा जिंकेल आणि जीवनात सशक्त धारणा, सकारात्मक विचार, विधायक भावना व प्रभावी वर्तनाची नांदी होईल.
You become what you think.
- Buddha
Mr. Abhijeet Manav.
( Mind trainer & NLP practitioner)
👌👌👌👍👍👍
ReplyDeleteSuperb...
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteखूप छान सर
ReplyDeleteExactly good
ReplyDelete